पोस्ट्स

एप्रिल, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विशेष वाचनीय

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

इमेज
म्युच्युअल फंडातून Wealth Management शक्य आहे का? हो—आणि कसं? “तुम्ही पैसे साठवताय… की खरोखर वाढवताय? आज घेतलेला छोटा गुंतवणुकीचा निर्णय उद्या तुमचं संपूर्ण आर्थिक भविष्य बदलू शकतो.” “मी, विशाल लोणारी (NISM CERTIFIED) – VHN FINSERV च्या माध्यमातून गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन करत आहे.” मानवी जीवन शतकानुशतके बदलत गेले आहे. उत्क्रांत आणि आधुनिक होत चालले आहे. जगण्यात बदल होत गेले तशा मानवाच्या गरजाही बदलत चालल्या आहेत. गरजा बदलल्यामुळे खर्च आणि संपत्ती दोन्हींमध्येही वाढ करणे हीच मोठी मानवी गरज बनली आहे. त्यामुळे आता संपत्ती निर्माण करावयाची झाल्यास नव्या जमान्याच्या नव्या जोमाने ती निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी एक ताकदवान माध्यम म्हणून Mutual Fund आपल्या समोर येत आहे. आजच्या काळात म्युच्युअल फंडामध्ये एवढी ताकद आहे की, तुमचे बदलतं जीवनमान सुरू राहताना महागाईसोबत लढाई करताना Wealth Management करण्यात प्रभावी पर्याय म्हणजे Mutual Fund. VHN FINSERV च्या माध्यमातून आणि विशाल लोणारी ( NISM CERTIFIED) यांच्या मार्गदर्शनात म्युच्युअल फंडात योग्य पोर्टफोलिओ तयार करून श्रीमंतीसह ...

मनाने मनाशी जोडलेले.....

मनाने मनाशी जोडलेले..... एव्हाना कसे असते सगळे काही आवरले, खाणे-पिणे झाले की मी मस्त आणि मस्ट अशी ताणून देत असतो. आताही तसेच करायचे होते परंतु त्याला वाव मुळीच नव्हता. माझ्याच राज्यात,विश्वात मी माझ्यासाठी जरी होतो तरी माझ्याबाहेर जो धुमाकूळ सुरु होता त्याला मात्र माझ्याशी माझ्या वाग्न्याशी काहीही देणे घेणे नव्हतेच ना, म्हणून माझ्याशी भांडून मी बाहेर पडलोच आणि ....... मोकळी हवा स्पर्शून गेली ... अहाहा किती सुखद, जाणीवांनी अलवार जाणीव मला वार्यांची जाणीव करून देत होती. अलबत ! ती उकाड्याची आहे त्या झुळूकेतही उष्मा आहे हे मला कळून आले. सर्वत्र निखारे निखारेच दिसत होते, माझे लक्ष आजूबाजूला गेले. इथे आता मी एकटाच होतो (पुन्हा?) नाही, मी सगळ्यांच्यासोबत होतो खरा पण बाहेर य्वून उगाच एकटेपणाला शिलगावत राहिलो, आणि मग आपसूकच केसांतून हात फिरवत मग मी बाहेरील दृश्याचा आस्वाद घेण्यासाठी बाहेर डोकावू लागलो. ती आतोनात अगम्य, गूढ अर्थ सांगणारी पण सारे जग कापून काढेल अशा आवेशात पुढे सरकणारी धडधड सुरु होतीच. पण बघावी नवे उमल जणू या विचारानेच मी बाहेर डोकावले तर झरोक्याच्या अल्याड नी ...

गझल

गझल रंगात रंग साऱ्या मिसळे कधीकधी जग हे मुजोर बेरंग छळे कधीकधी डोळ्यात शोधताना हरवायची जिथे देहात तेच काळीज जळे कधीकधी पाहून हाल ज्यांचे रुखरूख व्हायची त्यांनीच टोचले हाय खिळे कधीकधी आनंद झूल झुलवी मज जो नभावरी दु:खे तशीच मज भेट मिळे कधीकधी कोणास काय स्मरते विसरून माणसा जातीस मोडलेल्यास गिळे कधीकधी विशू

गाज

तुला  बघू कि बघू समुद्राची गाज एकच पडलेला प्रश्न …………। दोघेही माझ्या मैत्रिणी …………। अगदी खास दोघींचाही आहे फेसाळ शुभ्र साज सांग ना, तुला बघू कि बघू समुद्राची गाज विशू 

ओरिगामी- एक समृद्ध कला

इमेज
एका चौरस कागदाचे तुम्ही काय कराल ? कुणी म्हणेल त्यावर हिशेब लिहू, यादी लिहू, किंवा सगळ्यात चांगलं चोळामोळा करून फेकून देवू. पण टोच कागद त्याला कुठेच न कापता, कुठे न चिटकवता त्यातून एक आकर्षक असे फुल, बॉल, प्राणी, पक्षी तयार करता आले तर ? किती मोहक, आकर्षक असेल ते पाहणंही. काय आठवला तो कार्यानुभवाचा तास, हे सगळे करायचो आपण, ओरीगामितून. एखादा कागद, न कापता, न चिटकवता त्याला फक्त घड्या घालून एखादी सुंदर, मोहक अशी कलाकृती तयार करता येते, ओरीगामित   कागदाला घातलेल्या वेगवेगळ्या घड्यांमुळे प्राणी, पक्षी, फुले, आर्किटेक्चर्स, बॉल आणि अन्य भौमितिक आकार त्रिमितीय स्वरूपात बनवता येतात, चित्रात ज्याप्रमाणे आकृतीत दोन बाजू दिसतात त्याप्रमाणे अधिकच वास्तववादी कलाकृती ही ओरीगामित बनते, ज्यामुळे तिचं रुपडं हे अधिक आकर्षक, देखणे दिसते.  कविता करणे असो, संगीताची चाल बंधने असो, नृत्य असो किंवा एखादी जाहिरात निर्मित्ती असो या सगळ्यांत एक गोष्ट कटाक्षाने पाळली जाते, जपली जाते ती म्हणजे त्या कलेचे सौंदर्य आणि ओरीगामितही जपानी कलाकरांच्या पूर्वजांनी हा नियम या कलेसाठी लागू केला आहे. सगळं काही तर्क...

आई ...........

आई आ ई ....... तुझ्यासाठी शब्दांची माळ ओवू  कसा  तुजवरच्या प्रेमाला कवितेत, मी गुंफू कसा तू दिलेस मला इतके, आजवर.... मी हट्ट केला तेव्हाही...... मी मागितले नसेन तेव्हाही डोळ्यात पाणी, गळ्यात हुंदका दाटून येई हृदयात माझ्या डोकावता, मन सुन्न होऊन जाई मायेने जेव्हा तू हसून माझ्याकडे  पाही................. डोळ्यातले  अश्रू  गळताना, ओठ आर्त पुकारी ........ आ ई माझ्यासाठी किती कष्ट सोसले उपाशी निजून तू मला पोसले रात्र रात्र जगुन काढली .... मी तळमळू नये म्हणून .... काट्यांवर चालून तू  धरलीस पाखरावर फुलवाई काळीज पिळवटून टाकता,  हुरहूर लागून राही प्रेमाने जेव्हा तू जवळ घेई............... अंतरात  गहिवर दाटताना, जीवनी थरथर गाई ......... आ ई मी कितीदा चुकलो मी शरम सोडून वागलो तुझी माया परि कमी झाली नाही ..... कायमसाठी तू मला दूर लोटले नाही ........ माझ्या भाळी दुर्दैवाची  लागली होती फेरी  कसा बरे झालेलो माझाच मी वैरी दूर तुला करून गेलो...........  आई परि मला जवळ घेतलेस, थोर तू गं  बाई आठवांची त्या उन्माळी येता सांग कसा होऊ उतराई .............

प्रेम कविता

इमेज
अनिमीष वाट ह्रदयात तेवूनी दिवा प्रीतीचा तुझ्या  तुज भेटण्यासाठीच जगले, अश्रू पिउन आशा कशी विझणार माझी तू सांग ना जर,  आस होती मनाची वाती, बनुन....\\धृ\\ झाले सितम लाखो धुरा आयुष्यातली सांभाळली रे तुजविना विराणी जगुन ..... नादान मोठे ठरले मला खूळे जाणती तू ना कधी सामोरला परकासा म्हनुण........\\१\\ होता बरे तो चंद्र माझ्या संगे चालला मी ध्यान केले प्रीतशशिरा तुजला स्मरुन आलास नेण्याला प्रियेला साजन तिचा अनिमीष वाटेवर उभी सय हेवा करुन...\\२\\                                                                             विशाल लोणारी

कथासंग्रह परीक्षण

इमेज
माणसं आणि माणसं माणूस काय आहे याचा अंदाज माणसांनाही येत नाही, माणूस ही जातच काहीशी अशी आहे.  आयुष्यात कुणी एक माणूस कस वागेल, बोलेल याचे कोणतेही सूत्र नाही. एकंदरच माणूस म्हणजे एक गूढ आणि अनाकलनीय प्राणी आहे. याच माणसालाही माणसाचे न कळलेले गूढ  सोडवण्याचा केलेला एक प्रयत्न म्हणजेच जयंत बेंद्रे यांचा ‘माणसं आणि माणसं’ हा कथासंग्रह. पूर्वी काही कथास्पर्धांतून पारितोषिक विजेत्या कथांचा हा संग्रह आहे. किशोर चिटणीस,  प्रशांत देशमुख, ययाती, सुवर्णा आदी पात्रांच्या रूपकातून वेगवेगळ्या स्वभावांच्या माणसांचा लेखकाने यात वेध घेतला आहे.  यातील पात्र ही मध्यमवर्गीय , उच्च मध्यमवर्गीय अशी म्हणजेच समाजात  आपल्या आसपास वावरणारीच आहे, त्यांच्या प्रत्येकाची एक कहाणी आहे. गूढ उकलत जाताना नेहमीच वाचक पुढे काय होईल याचा अंदाज वाचक नेहमीच लावत असतात, परंतु त्यांच्या ठोकताळ्यांची माती करत या कथेचा शेवट आपल्या पुढ्यात येतो, अगदी अनपेक्षित असा. कथेतील नायक/ नायिका  ह्यांच्या काही बाजू आहेत, चांगल्या वाईट, यातून पात्र कोड्यात टाकत जाते. लेखक सिनेमा नाटकातील नट होते त्यामुळे प्रत्ये...