विशेष वाचनीय

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

इमेज
म्युच्युअल फंडातून Wealth Management शक्य आहे का? हो—आणि कसं? “तुम्ही पैसे साठवताय… की खरोखर वाढवताय? आज घेतलेला छोटा गुंतवणुकीचा निर्णय उद्या तुमचं संपूर्ण आर्थिक भविष्य बदलू शकतो.” “मी, विशाल लोणारी (NISM CERTIFIED) – VHN FINSERV च्या माध्यमातून गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन करत आहे.” मानवी जीवन शतकानुशतके बदलत गेले आहे. उत्क्रांत आणि आधुनिक होत चालले आहे. जगण्यात बदल होत गेले तशा मानवाच्या गरजाही बदलत चालल्या आहेत. गरजा बदलल्यामुळे खर्च आणि संपत्ती दोन्हींमध्येही वाढ करणे हीच मोठी मानवी गरज बनली आहे. त्यामुळे आता संपत्ती निर्माण करावयाची झाल्यास नव्या जमान्याच्या नव्या जोमाने ती निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी एक ताकदवान माध्यम म्हणून Mutual Fund आपल्या समोर येत आहे. आजच्या काळात म्युच्युअल फंडामध्ये एवढी ताकद आहे की, तुमचे बदलतं जीवनमान सुरू राहताना महागाईसोबत लढाई करताना Wealth Management करण्यात प्रभावी पर्याय म्हणजे Mutual Fund. VHN FINSERV च्या माध्यमातून आणि विशाल लोणारी ( NISM CERTIFIED) यांच्या मार्गदर्शनात म्युच्युअल फंडात योग्य पोर्टफोलिओ तयार करून श्रीमंतीसह ...

कथासंग्रह परीक्षण

माणसं आणि माणसं

माणूस काय आहे याचा अंदाज माणसांनाही येत नाही, माणूस ही जातच काहीशी अशी आहे.  आयुष्यात कुणी एक माणूस कस वागेल, बोलेल याचे कोणतेही सूत्र नाही. एकंदरच माणूस म्हणजे एक गूढ आणि अनाकलनीय प्राणी आहे. याच माणसालाही माणसाचे न कळलेले गूढ  सोडवण्याचा केलेला एक प्रयत्न म्हणजेच जयंत बेंद्रे यांचा ‘माणसं आणि माणसं’ हा कथासंग्रह. पूर्वी काही कथास्पर्धांतून पारितोषिक विजेत्या कथांचा हा संग्रह आहे. किशोर चिटणीस,  प्रशांत देशमुख, ययाती, सुवर्णा आदी पात्रांच्या रूपकातून वेगवेगळ्या स्वभावांच्या माणसांचा लेखकाने यात वेध घेतला आहे.  यातील पात्र ही मध्यमवर्गीय , उच्च मध्यमवर्गीय अशी म्हणजेच समाजात  आपल्या आसपास वावरणारीच आहे, त्यांच्या प्रत्येकाची एक कहाणी आहे. गूढ उकलत जाताना नेहमीच वाचक पुढे काय होईल याचा अंदाज वाचक नेहमीच लावत असतात, परंतु त्यांच्या ठोकताळ्यांची माती करत या कथेचा शेवट आपल्या पुढ्यात येतो, अगदी अनपेक्षित असा. कथेतील नायक/ नायिका  ह्यांच्या काही बाजू आहेत, चांगल्या वाईट, यातून पात्र कोड्यात टाकत जाते. लेखक सिनेमा नाटकातील नट होते त्यामुळे प्रत्येक कथा ही एखाद्या पटकथेप्रमाणे रंगत आणि बोलत जाते. लेखकही तटस्थ राहत सूत्रधाराचे काम बजावतोच. आपण एखाद्या प्रसंगात रम्य झाले असताना अचानक त्या प्रसंगाला उलटे वळण मिळते आणि वाचक मनाला जरासा हादरा बसतो. कधी नर्मविनोदी, कधी गंभीर,  अशा प्रसंगपटलातून  कारुण्यतेच्या वळणावर येऊन पात्र कथेचा शेवट घेउन थबकते. माणसाचे गूढ शोधणारा कथासंग्रह उस्तुकता म्हणून वाचाच.     


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग