विशेष वाचनीय

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

इमेज
म्युच्युअल फंडातून Wealth Management शक्य आहे का? हो—आणि कसं? “तुम्ही पैसे साठवताय… की खरोखर वाढवताय? आज घेतलेला छोटा गुंतवणुकीचा निर्णय उद्या तुमचं संपूर्ण आर्थिक भविष्य बदलू शकतो.” “मी, विशाल लोणारी (NISM CERTIFIED) – VHN FINSERV च्या माध्यमातून गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन करत आहे.” मानवी जीवन शतकानुशतके बदलत गेले आहे. उत्क्रांत आणि आधुनिक होत चालले आहे. जगण्यात बदल होत गेले तशा मानवाच्या गरजाही बदलत चालल्या आहेत. गरजा बदलल्यामुळे खर्च आणि संपत्ती दोन्हींमध्येही वाढ करणे हीच मोठी मानवी गरज बनली आहे. त्यामुळे आता संपत्ती निर्माण करावयाची झाल्यास नव्या जमान्याच्या नव्या जोमाने ती निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी एक ताकदवान माध्यम म्हणून Mutual Fund आपल्या समोर येत आहे. आजच्या काळात म्युच्युअल फंडामध्ये एवढी ताकद आहे की, तुमचे बदलतं जीवनमान सुरू राहताना महागाईसोबत लढाई करताना Wealth Management करण्यात प्रभावी पर्याय म्हणजे Mutual Fund. VHN FINSERV च्या माध्यमातून आणि विशाल लोणारी ( NISM CERTIFIED) यांच्या मार्गदर्शनात म्युच्युअल फंडात योग्य पोर्टफोलिओ तयार करून श्रीमंतीसह ...

स्व-सोबत

माणूस स्वतः स्वतःच्या सोबत असतो का ? किती वेळ असतो ? माणसाने स्वतःच्या सोबत वेळ घालवावा का ? जर हो तर किती, नाही तर का नाही ? मेंदूला जड वाटणारे हे सगळे प्रश्न आहेत, याची उत्तरे मोठी चमत्कारीकच आहेत.

स्वप्न, आभासी असतात. हे खरं आहे, मात्र स्वप्नात प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या सोबत असते. त्या आभासात, त्याच्या विचारात, माणूस स्वतःची सोबत कधी सोडत नाही. कारण, निव्वळ सोपं आहे. स्वप्नात माणसाला त्याच्या लायकीपेक्षा जास्त, आणि त्याच्या आवडीचं जगायला मिळत असते. म्हणून वास्तवापेक्षा तो स्वप्नातच स्वतःच्या सोबत, एकटा खुशाल असतो.

मनाचे विश्व सोडून त्याला जेव्हा बाहेर अभिव्यक्त व्हायचे असते, तेव्हा प्रत्येकवेळी घडणारी कृती स्वच्छंदी पणाची नसते. अनेक काळज्या, चिंता, यातून तो वेढलेला, खंगत खंगत चालणारा, आणि म्हणूनच अनेकदा गर्दीतही एकटा पडलेला असा असतो. एकटं पडणं, किंवा निम्न मनस्वीय परिस्थितीत जगणं यामुळे माणसाची त्याच्या स्वतःपासूनच ताटातूट होते.

पण, मग जगायचं तरी कसं ? नेहमीच स्वतःसोबत जगता येणं शक्य नाही. नेहमीच अस्वछंदी जगून आयुष्य निर्गम करत राहणे योग्य नाही. तर हा प्रश्न,बहुदा माणूसपरत्वे ज्याने त्याने सोडवायचा असतो. प्रत्येकाला जमणं अशक्य आहे, पण स्वप्नात स्वतःसोबत चालताना वास्तवातही खुशाल जगता येण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे स्वतःची ध्येय्य, स्वप्ने अचूक प्रयत्नांनी पूर्ण करत जगणे. त्यासाठी अनेक मर्यादा ओलांडाव्या लागतात, अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.

यासगळ्यातूनच स्वतः स्वतःसोबत जगणे शिकायचं असतं. इतरांनाही माणूस बनवून सोडताना, हीच प्रक्रिया करायची असते. सरतेशेवटी जगणं, जगण्यासाठी, जगणाऱ्यांसाठी जगणं अतिशय महत्त्वाचं.

माणूस स्वतः स्वतःच्या सोबत राहू शकतो. त्याला हवं तितक्यावेळ तो राहू शकतो. बिलकुल ताण न देता, मनातून विचार केला तर कोणताच प्रश्न जड वाटत नाही

टिप्पण्या

  1. आजचे जग प्रचंड धावपळीचे आणि cut throat competition असलेले आहे. यात टिकण्यासाठी प्रत्येकजण धडपड करत आहे. याच परिस्थितीमुळे स्वतःकडे किंवा इतरांच्या सुख, दुःखात इच्छा असूनही सहभागी होत नाही आणि हे वाढत जात आहे. मार्शल मॅकलुहान या माध्यमतज्ज्ञाने म्हटले आहे, "The world became a global village" आणि आज माध्यम क्रांतीमुळे ते झाले देखील आहे. पण माणुसकी मात्र कुठेतरी स्वकेंद्रित झाल्याचे दिसून येत आहे...

    हे बदलणे अत्यंत आवश्यक आहे!!!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग