विशेष वाचनीय

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

इमेज
म्युच्युअल फंडातून Wealth Management शक्य आहे का? हो—आणि कसं? “तुम्ही पैसे साठवताय… की खरोखर वाढवताय? आज घेतलेला छोटा गुंतवणुकीचा निर्णय उद्या तुमचं संपूर्ण आर्थिक भविष्य बदलू शकतो.” “मी, विशाल लोणारी (NISM CERTIFIED) – VHN FINSERV च्या माध्यमातून गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन करत आहे.” मानवी जीवन शतकानुशतके बदलत गेले आहे. उत्क्रांत आणि आधुनिक होत चालले आहे. जगण्यात बदल होत गेले तशा मानवाच्या गरजाही बदलत चालल्या आहेत. गरजा बदलल्यामुळे खर्च आणि संपत्ती दोन्हींमध्येही वाढ करणे हीच मोठी मानवी गरज बनली आहे. त्यामुळे आता संपत्ती निर्माण करावयाची झाल्यास नव्या जमान्याच्या नव्या जोमाने ती निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी एक ताकदवान माध्यम म्हणून Mutual Fund आपल्या समोर येत आहे. आजच्या काळात म्युच्युअल फंडामध्ये एवढी ताकद आहे की, तुमचे बदलतं जीवनमान सुरू राहताना महागाईसोबत लढाई करताना Wealth Management करण्यात प्रभावी पर्याय म्हणजे Mutual Fund. VHN FINSERV च्या माध्यमातून आणि विशाल लोणारी ( NISM CERTIFIED) यांच्या मार्गदर्शनात म्युच्युअल फंडात योग्य पोर्टफोलिओ तयार करून श्रीमंतीसह ...

आरोग्यदायी सल्ला - मिसळ खा, स्वस्थ राहा

नाशकात प्रत्येक कॉलनीत एक खानावळ असतेच. जिथं शिकायला आलेली मुले मुली वास्तव्य करतात तिथे तर हमखास असते. त्या मुलांचे पोट भरणारी आणि खिशाला परवडणारी अशी जगातली सोय म्हणजे या खानावळी. या फोटोतील मिसळ हॉटेल त्रिमूर्तीची आहे. घरगुती पद्धतीच्या मिसळीला जरासे तिखट बनवून, मोठी शेव टाकली, लाल रस्सा झाला की झटकेदार मिसळ तयार.

अशा खानावळींचे आर्थिक गणित बेतानेच जुळते. यामुळे सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेली खानावळ दुपारपर्यंत संपलेली असते, मग उरलेल्या रस्सावर खानावळीत आलेल्यांना भूक भागवावी लागते. तसंही, मिसळीची गंमत अशी की लोक त्या रस्सासाठीपण जीव टाकतील.

खानावळीत एक आजी तर पाहिजेच. हो, शहरभरची हा प्रेमळ ट्रेंड झाला आहे. अनेक आया-आजी खानावळ चालवतात. तर, या आजी मला हा फोटो काढल्यावर म्हणताय, 'सुनेला पाठवायचा का' ? मी फोटो काढताना दिसलो म्हणून बोलल्या. इतर मुलं जी भुकेल्या चेहऱ्याने काळवंडून चालली होती, त्यांनाही मायेने चौकशी करून या आजीबाई खायला देतात. खानावळीत असा मायाळूपणा खूप जाणवतो.

मिसळ खाऊन पोट आपोआप भरून जाते. पावात ईस्ट वगैरे पदार्थ असतात, ते पोटात फुगतात वगैरे गोष्टी फार लक्षात घ्यायच्या नाहीत. अशावेळी, मिसळो परम धर्म म्हणून तिचा आस्वाद घेण्याचे पुण्यकर्म पटपट करून टाकायचे असते. छोट्या खानावळीत कदाचित रस्साही फार वेळा दिला जात नाही तरी शेवटी नुसता रस्सा वरपणे सोडायचे नाही. मिसळ खाताना मुळीच गद्दारी करू नये. पोळी भाजीला लावून खातो तशी खाऊ नये. यासाठीच भाजीच्या रश्यात पोळी चुरून कुस्करून खायची सवय लावूनच घ्यावी. म्हणजे, मिसळ खाताना तिचा अपमान होत नसतो.

Pic credit - author

मिसळ कधी कुणावरच कोपत नसते. काही मिसळींचा स्वभावच फारच अतरंगी ज्या पोटात जिरल्यानंतरही आपल्याला एक वेगळा 'झनाटेदार' आनंद देत असतात. असे जरी असलं तरी मिसळीचे एक वैशिष्ट्य म्हणजे ती खाल्याने तुम्हाला आंबट ढेकर येऊच शकत नाही, यामुळे मिसळीमुले पोट खराब होते असे म्हणणाऱ्याचे तिखट मिठाची बटाटा भाजी खाऊन पण दुखते असे समजून त्याकडे दुर्लक्ष करायचे असते. म्हणूनच स्वस्थ राहायचे असते तर मिसळ खाणे अनिवार्यच ठरते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग