विशेष वाचनीय

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

इमेज
म्युच्युअल फंडातून Wealth Management शक्य आहे का? हो—आणि कसं? “तुम्ही पैसे साठवताय… की खरोखर वाढवताय? आज घेतलेला छोटा गुंतवणुकीचा निर्णय उद्या तुमचं संपूर्ण आर्थिक भविष्य बदलू शकतो.” “मी, विशाल लोणारी (NISM CERTIFIED) – VHN FINSERV च्या माध्यमातून गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन करत आहे.” मानवी जीवन शतकानुशतके बदलत गेले आहे. उत्क्रांत आणि आधुनिक होत चालले आहे. जगण्यात बदल होत गेले तशा मानवाच्या गरजाही बदलत चालल्या आहेत. गरजा बदलल्यामुळे खर्च आणि संपत्ती दोन्हींमध्येही वाढ करणे हीच मोठी मानवी गरज बनली आहे. त्यामुळे आता संपत्ती निर्माण करावयाची झाल्यास नव्या जमान्याच्या नव्या जोमाने ती निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी एक ताकदवान माध्यम म्हणून Mutual Fund आपल्या समोर येत आहे. आजच्या काळात म्युच्युअल फंडामध्ये एवढी ताकद आहे की, तुमचे बदलतं जीवनमान सुरू राहताना महागाईसोबत लढाई करताना Wealth Management करण्यात प्रभावी पर्याय म्हणजे Mutual Fund. VHN FINSERV च्या माध्यमातून आणि विशाल लोणारी ( NISM CERTIFIED) यांच्या मार्गदर्शनात म्युच्युअल फंडात योग्य पोर्टफोलिओ तयार करून श्रीमंतीसह ...

काचेत बंद झाला माणूस !


माणूस माणसासारखं वागणं विसरला आहे. मुंबईसारख्या मेट्रो शहरात तरी हा अनुभव निराळा नाही. याला जबाबदार कोण ? ढासळत गेलेल्या सामाजिक जाणिवा, वाढती गुन्हेगारी, अन माहिती व तंत्रज्ञानाने वेढले  गेलेली अख्खी मानव जमात. 

आज प्रत्येकाला चटक लागली आहे. खोट्या खोट्या प्रसिद्धीची हरेक माणूस बेताल-बेभान होत चालला आहे. अनेक वर्षे त्याला या प्रसिद्धी, प्रतिष्ठा या गोष्टी निव्वळ कर्तृत्ववान लोकांनाच मिळू शकतात, हेच माहीत होते पण हा विचार आता मागे पडला आहे. आता, अवघ्या मिनिटभरात तो सोशल मीडियावरून रातोरात स्टार बनू शकतोय. लोकांना भुरळ पाडतोय. त्याला प्राप्त होणाऱ्या जळमटेसारखी असणाऱ्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी तो माणुसकी विसरत जात आहे. लोक घरात जळमटे लागलेलं ठेवत नाहीत. त्याचप्रमाणे सोशल मीडियातील लोकही कुणालाच कायम स्मरणात ठेवत नाहीत. त्यांना सतत नव्या गोष्टी बघण्याचा ध्यास लागलेला असतो. नव्या लोकांना भेटायची ईच्छा जागृत होते. त्यामुळे अनेक लोक एकमेकांना जवळ आलेत, कनेक्टेड झालेत पण त्यांच्यात जिव्हाळा उरला नाही. परिणामी माणुसकीचा झरा लोकांच्या हृदयाला फुटणे बंद झाले. सोशल मीडिया, तंत्रज्ञान यामुळे स्वतःचा आंनद त्यांना सर्वाधिक महत्वाचा वाटू लागला आहे. 

आजूबाजूला असलेले लोक व्हॉट्सअप, फेसबुकवर परदेशात असलेल्या कधी न पाहिलेल्या माणसाशी तासंतास बोलतात. चॅट-कॉल करतात. पण, गाडीत आपल्याबरोबर प्रवास करणारी अनोळखी व्यक्ती रोज दिसूनही तिला आपलंसं करून घ्यावे वाटत नाही. पौगंडावस्थेतील मुलांच्या बाबतीत त्यांना पालक-शिक्षक रागवत असताना मनातून आपल्या चुकांचेही कौतुक करणाऱ्या ऑनलाइन जगातील लोकांशी बोलण्याची तीव्र ईच्छा निर्माण होत राहते. ह्या सगळ्याला जबाबदार आपणच आहोत. 

इंटरनेटने एक चौकट प्रत्येकाला आखून दिली. त्या मर्यादित चौकटीत ढीगभर माहिती इंटरनेट ओतू लागलं. अगदी नाव वा फोटो असेल तरी एखाद्या व्यक्तीबद्दल कळून जाऊ लागलं. मग, लोक आपणहून कुणी दुसऱ्यांशी बोलणं विसरून गेले. आता, समजा त्यांच्या एकलकोंड्या जगातून त्यांना उठवायचा, बाहेर आणायचा प्रयत्न झाला तर मग सूड किंवा खुनशीपणाने लोक बोलायला नाही तर डायरेक गच्ची धरायलाच बघतात. हाच काय तो माणसांना दाटून येणारा मायेचा उन्माळा. 

एकस्तिमित जगायची सवय झाल्याने माणूस टर्म्स अँड कंडिशन आखून जगू लागला आहे. नेहमीप्रमाणे त्यांना इतरांनी न वाचता स्वीकाराव्या अशी त्याची प्रबळ मनीषा असते. मग, तो आजूबाजूला असणारे सौंदर्य टिपण्याचे सोडून आंतरजालावरील बेगडी सुंदरता अनुभवत बसण्यात धन्यता मानतोय. आता, हे वाईट की चांगलं हा स्वतंत्र संवादाचा मुद्दा ठरतो. प्रत्येकाचा चष्मा वेगळा असतो. त्याला दिसणारे जग वेगळं असतं. पण, आजच्या काळातील हेच वास्तव ठरतंय. माणूस जोडला जातोय, आपलासा होत नाही. फ्रेंड्सपेक्षा फॉलोअर्स करण्यावर त्याचा भर दिला जातोय. 

यावर माणसं वाचन अन पुस्तक वाचन हा एक सुंदर उपाय असू शकतो, त्यासाठी मात्र लॅपटॉप, मोबाईल सोडून आभाळाकडे, निसर्गाकडे, पाखरांकडे अन बाजूच्या माणसाकडे मान वर करून बघावं लागेल. इंटरनेटची चाकोरी तोडायला लागेल

© विशाल लोणारी, २०१९

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग