विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

पावसाळा

चिंब पावसानी रान झालं आबादानी
चिंब पावसानी रान झालं आबादानी ........ झाला एकदाचा पावसाळा सुरु. यंदाच्या वर्षी न चुकता ७ जुन पासून पावसाला सुरुवात झाल्यामुळे लहान-थोरांत आणि अर्थातच यंगस्टार्समध्ये आनंद पसरला आहे. तरुणाईचे आणि पावसाचे वेगळे असे नाते आहे. हे वयच असे असते ना मित्रांनो. पाऊस सुरु झाला की मन हर्षंभरीत होते, वाफाळलेला चहा, भजी यांच्यासोबत गारवाची गाणी अहाहा काय सुंदर मिलाफ घडून येतो.

 पाऊस बरसात असला की चिंब भिजावेसे वाटते, जुन्या आठवणी जाग्या होतात, त्यांच्यात मन रमवावेसे वाटते. पाऊस सुरु झाला की जसं आभाळ भरून आलेले असते तसेच मग आपले मनही हळुवार वळण घेत मागे जाते, नोस्टेल्जीक व्हायला होते, अनेक सुखा-दुखाच्या आठवणींची रिमझीम मनात सुरु होते, मग पाण्यात होडी सोडणारे, पाणी-चिखल तुडवत जाणारे बालपण डोळ्यांसमोर तरळते, तर तिच्या वा त्याच्याशी झालेली पहिली नजरानजर, मारलेल्या गप्पा,बाईक राईड आणि मग तुटलेलं वा जुळलेलं नातं, फोन-कॉल्स, चाटींग, या सगळ्या आठवणींनी गहिवरून यायला होतं. तर असा खूप धमाल ऋतू म्हणजे पावसाळा.

पावसाला सुरु होतो तेव्हा कॉलेज कॅम्पसही जरा फुलू लागलेले असतात. दहावी पास झालेल्यांची अकरावी प्रवेशासाठी धावपळ, तर बारावी सुत्लेल्यांची प्रवेश परीक्षांची धावपळ. तर जे कट्टेकरी मात्र डिग्री किंवा पीजी करणारे असतात त्यांच्या मात्र अजूनही सुट्ट्या चालू असत, मागच्या वर्षीचा निकाल साधारण जुलैपर्यंत लागणार असतो, अशावेळी मग पावसाळ्याचे सुरुवातीचे दिवस या गँग्सना काळ्या-सावळ्या ढगांतून झिरपणाऱ्या रेशीम धारांत नखशिखांत भि’जून’ थेंबांची, लूट करता येते, खुश राहता येते.

पावसाळ्यात बहरणारी आणखी एक गोष्ट म्हणजे बहरणारी हिरवळ, गारव्याचा पाऊस पडून गेल्यानंतर जेव्हा कॉलेजचे फंडूमंडळी कॅम्पसला येतात, तेव्हा त्यांच्या दृष्टीस पडतो तो हिरवागार परिसर. सगळीकडे हिरवळ अंकुरलेली असते, नवीन गवत उगवलेले असते, ओसाड, माळरान गर्द नटलेले पाहून मनही प्रसन्न होत असते.

कधीकधी पाऊस मात्र यंगब्रिगेडशी पंगा पण घेतो, सततची रिपरिप, चिकचिक, मरगळ झाल्याने मग आपल्या अवतार अगदीच गबाळेछाप असा दिसू लागतो, मित्र-मंडळींत चेष्टेचा विषय ठरतो, तर ज्या भिडू लोकांना बराच लांबचा प्रवास करून कॉलेज गाठायचे असते त्यांना तर बस.रिक्षा, बाईक सगळीकडेच पीडतो. पण तरी सगळ्यांना पावसाळा हवाहवासाच वाटतो, आनंद, आठवणी वाटणारा, पावसाळा.

विशाल लोणारी, नाशिक 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

After The Rain... Moon is Beautiful - Ebook Review in Marathi