कदाचित पुढील प्रसंग वाचून, काय फेकतोय हा ! अशी प्रतिक्रिया स्वाभाविकपणे उमटेल, मी सांगतोय त्यावर विश्वास ठेवणे अवघड वाटेल. तरीही बिनघोर प्रस्तुत प्रसंग हा खरा आहे आणि तो योगायोग नाही बरं का !
पावसाळ्याचे दिवस असतील. पाऊस मुसळधार पडून गेल्यानंतरचे कोरडे, ढगाळ हवामान होते. वारा सुखद आणि आल्हाद गारव्यासह. एके दिवशी रविवारी सकाळी साडे आठ-नऊ वाजेच्या सुमारास बाईक राईडसाठी म्हणून मी निघालो घरापासून जवळच असणाऱ्या आणि नवे नवे डांबरीकरण केलेल्या रस्त्यावरून सुसाट गाडी पळवत होतो. रस्ता शहरातील म्हसरूळ आणि गिरणारे यांना जोडणारा होता, या रस्त्यावरून जाताना दरी, मातोरी, मखमलाबाद अशी छोटी गावं लागतात, माझ्या हिरो होंडा पॅशन गाडीवरून वाऱ्याशी मी बोलत निघालो . व्ह्रूम व्ह्रूम करत फिरताना रस्त्याच्या दुतर्फा असलेली हिरवीगार शेती नजरेस पडली. एक दोन साधी घरे, माडाची झाडे, फुलांची शेती, द्राक्षाचे बाग आणि लांबवर असलेले तरी नजरेत मावणारे हिरवा थाटमाटाचे डोंगरही दृष्टीत सामावले गेले. मला ते माझ्यासोबत रहावे असे वाटले, यासाठी त्यांचे फोटोज काढणे वा शूट करून घेणे गरजेचे होते. यातून मला दोन फायदे होणार होते, फोटोग्राफर मित्राने दिलेल्या सल्ल्यानुसार कोणतेही रॉ शूट वाया जात नाही(कोणत्याही बातमीच्या पॅकेजमध्ये त्याचा वापर करू शकलो असतोच ना) दुसरे म्हणजे परत, परत थोडीच ना अशी निसर्गाशी गट्टी जमवायला आले असते. तेव्हा वेळ न दवडता आयुष्यातलं पहिलंवहिलं शूट उरकायचे होते. कसे बरे जमवता येईल.. विचार करत असताना ट्यूब पेटली. गाडी थांबवली.
खिशातून मोबाईल काढत काही फोटोज काढले ज्यात पानांनी गच्च बहरून आलेल्या द्राक्षबागा होत्या, मातोरीतून दरीस जाणारा तो खडकाळ अरुंद रस्ता, त्याच्या कोपर्यावरचे झाड, दिसायला खूप छान होते ते. यानंतर फोटो काढले ते डोंगराचे, उभा राहिलेलो तिथून ते डोंगर १२ किलोमीटरवर असूनही रुबाबदार उंचीमुळे उठून दिसायचे. मी पूर्ण हौस भागवून घेतली मित्रांनो. परत जायचे म्हणून मग नाशिकच्या वेशीपासून वळलो; तरी हे सारे अनन्य वैभवी गर्द क्षण हातून सुटत चालल्यासारखे वाटू लागले, यांना एकत्र समेटून घेण्यासाठी अजून एक शक्कल लढवली.
पुन्हा एकदा गाडी थांबवली, कॅमेरा सुरु केला यावेळेस व्हिडीओचा, पिक अप घेत गाडी पुन्हा भन्नाट, स्पीड, गेअर्स शिफ्टसोबत कधी मोबाईल उजव्या हातात, मग डाव्या हातात, समोरून जाणारे सायकलवाले, ट्रक्स, पायदळी असलेली मंडळी यांनाही भोवतीच्या मस्त हिरव्या निसर्गासोबत मोबाईलमध्ये उतरवत होतो, अशा वेळेस क्लच हातात न घेता गेअर्स कमी-जास्त करत हुल्लडस्वारी करणे म्हणजे भंबेरी उडवणारी, जीकरीचीच राईड होती.
गाडी वेगात असली, मोटारसायकल जरी असली तरीही कधी शूट करायचे असेल तर तेव्हा नक्कीच हा अनुभव माझ्या कामी येणार आहे. एकटा असल्याने स्वतःला स्वतःची अशी भिती नव्हती, त्यावेळी मला पळता भुई थोडी खरच भासली. या सगळ्यांतून मी एक गोष्ट नक्कीच शिकलो, धाडस करायला, एकट्याने बेधडक कुठेही जायला निघायला. घाबरायचं सोडून दिलयं आता.
विशाल लोणारी, नाशिक.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा