विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

पब आणि मराठी संस्कृती.


 
नाशिकसारख्या छोट्या शहरात कॉलेज रोड, गंगापूररोडवर तरुण-तरुणींचा धिंगाना रात्रभर सुरु असतो.  मेट्रो-सिटीज म्हणून नावारूपाला आलेल्या मुंबई-पुणे शहरात याचे प्रमाण अफाट आहे. वास्तविक पाहता आपल्या महाराष्ट्रात ‘सांस्कृतिक स्थित्यंतर’ किंवा ‘पाश्चिमात्य अनुकरणाचा’ पाया हा याच मेट्रो सिटीजमध्ये रोवला जातोय. का ?  आपल्या मराठमोळ्या संस्कृतीतही नृत्य, गायन या कला तुम्हाला करमणूक करवून देण्यासाठी समृद्ध आहेतच. मनोरंजन करू शकतीलच परंतु त्यातून  विचार विनिमय आणि  प्रबोधन करू शकतील असे कित्येक लोककलेचे प्रकार मराठी संस्कृतीत रुजलेले आहेत,(इतर भाषिक संस्कृतीतही आहेत, पण मला ज्यांची पूर्ण माहिती आहे त्याबद्दल मी सांगतो) जसे की भारुड, कीर्तन, अभंग, भजन, लोकगीते, लोकसंगीत आणि नृत्य, जागरण-गोंधळ  त्यांना  जोपासून, विकसित करून, जतन- संवर्धन करून आपली अस्मिता टिकवून पुढच्या पिढीस देणे हे मी  महाराष्ट्रीय किंवा जय भवानी-जय शिवाजी अशी हरोळी  देणाऱ्या, नुसताच मराठीपणाचा  टेंभा मिरवणाऱ्या प्रत्येक कलंदराचे आदिकर्तव्य होते. मात्र,  मराठी/ भारतीय  संस्कृती ही  परकीय भाषा, परंपरा यांच्या मुसळधार, अविरत अशा भडीमाराने लोप पावत चालली आहे, किंवा तिचे दर्शन दुर्लभ झाले आहे. परवाच आमच्या घराजवळून भारतीय पोशाखात दिमाखात  गोऱ्यापान रंगाची, निळ्या डोळ्यांची तरुण फॉरेनर  मुलगी जाताना दिसली तेव्हा मात्र आजूबाजूच्या मराठी बाणा विसरून गेल्या मुलींवर हसूच आले मला !

 परदेशातील लोक, लोकप्रतिनिधी, उद्योजक आपण भारतीयांची खिल्ली उडवत राहतात, बहुतांश देशात भारतीय नागरिकांना जगताना मानहानी, त्रास होत आहे, आणि भारतीयांनी त्यांच्या म्हणण्यानुसार वागले पाहिजे असा त्यांचा हेका आहे. बळजबरीचा ! मग मला सांगा आपण भारतीय का एक प्रकारे षंढ बनलो आहोत, अगदी सहजपणे आपण परकीय संस्कृती, भाषा, परंपरा स्वीकारतो, अंगिकारतो आहोत. अस्मिता, अभिमान, स्वाभिमान या गोष्टींची जाण काही विशेष प्रसंगात का करत राहतो आपण ? यातूनच पुढे वाढीस लागली आहेत व्यसनाधीनता खासकरून आम्ली पदार्थांचे व्यसन. जर आपण आपलं खरं अस्तित्व सोडून बाकीच्याच मृगजळास असेच भुलत गेलो तर आपल्याला भूरळ पडून, पेढा खाऊ घालून येडा बनविणारेच जास्त भेटतील.

 चला एक प्रयत्न करूया, भारतीयांची बदलेली जीवनशैली,  पाश्चिमात्य होत  गेली आहे, तिला  मूळ वैभव प्राप्त करून देण्यासाठी झटूया. प्रामाणिक प्रयत्न करून सुधारणा केली गेली नाही तर भविष्यातील  पिढीला भलताच भारत ठावूक होईल, आपली संस्कृती नामशेष झाली तर पुढची पिढी सुसंस्कारी कशी बनेल ? ज्ञानी कशी बनेल ? आजवर  वैभव आपण पाहिलं, जपलं त्याचा वारसा पुढे चालूच राहणार नाही. याचे  वाईट भोग आपल्यापैकीच अनेकांच्या वंशावळीतील  लोकांना भोगावे लागतील. आहात ना तय्यार

 

विशाल लोणारी, नाशिक

९५२७१३८५०५

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

गुलाब - प्रेयसीवर रचलेली मराठी कविता