विशेष वाचनीय

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

इमेज
म्युच्युअल फंडातून Wealth Management शक्य आहे का? हो—आणि कसं? “तुम्ही पैसे साठवताय… की खरोखर वाढवताय? आज घेतलेला छोटा गुंतवणुकीचा निर्णय उद्या तुमचं संपूर्ण आर्थिक भविष्य बदलू शकतो.” “मी, विशाल लोणारी (NISM CERTIFIED) – VHN FINSERV च्या माध्यमातून गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन करत आहे.” मानवी जीवन शतकानुशतके बदलत गेले आहे. उत्क्रांत आणि आधुनिक होत चालले आहे. जगण्यात बदल होत गेले तशा मानवाच्या गरजाही बदलत चालल्या आहेत. गरजा बदलल्यामुळे खर्च आणि संपत्ती दोन्हींमध्येही वाढ करणे हीच मोठी मानवी गरज बनली आहे. त्यामुळे आता संपत्ती निर्माण करावयाची झाल्यास नव्या जमान्याच्या नव्या जोमाने ती निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी एक ताकदवान माध्यम म्हणून Mutual Fund आपल्या समोर येत आहे. आजच्या काळात म्युच्युअल फंडामध्ये एवढी ताकद आहे की, तुमचे बदलतं जीवनमान सुरू राहताना महागाईसोबत लढाई करताना Wealth Management करण्यात प्रभावी पर्याय म्हणजे Mutual Fund. VHN FINSERV च्या माध्यमातून आणि विशाल लोणारी ( NISM CERTIFIED) यांच्या मार्गदर्शनात म्युच्युअल फंडात योग्य पोर्टफोलिओ तयार करून श्रीमंतीसह ...

आमची स्वप्ने

राबायचं का ?

युवा चेतना, युवा प्रेरणा, युवा शक्ती. भारत देशाची ही युवा ताकद कशासाठी वापरत यायला हवी ? बरोबर, खरंच या तरुण, उफाळत्या, सळसळत्या रक्ताची ऊर्जा परत तरुणांकरीताच उपयोगी यायला हवी आहे. नित्य वागणुकीतून, वैयक्तिक तामझामातून आपली सार्वत्रिक अशी एखादी तरी गोष्ट घडू शकत नाही का ? नक्कीच घडू शकते. यार हो, राबायचं खऱ्या अर्थाने याचकरीता. जेणेकरून आपली पिढी आणि भविष्यातील आपला निसर्ग हा सुरक्षित, पोषणात्मक मूल्यवर्धित आयुष्य जगू शकेल. याचबरोबर आज आपली व आपली पूर्वजांची, गुरुजनांची, वडीलधार्यांची म्हणजेच मागची पिढीही आपण विसरून चालणार नाही. राबायचं ते वर्तमान, भूत आणि भविष्यासाठी.

एक कथा वाचली. थंडीने कुडकुडनाऱ्या एका म्हातारीने त्याच्या मुलाला शाल आणायला सांगितली, तर त्याने उर्मटपणे घरखर्च आणि तिच्या सुनेच्या कपड्यांवर खूप खर्च झाला आहे तर पुढच्या थंडीत शाल घेऊन देईल असे सुनावले. आपल्या मुलाला थंडी वाजू नये म्हणून वेळप्रसंगी स्वतः फाटक्या चादरी पांघरून, लेकराला गोधडीत लपेटलेले उबदार बालपण देणाऱ्या आईने त्याच रात्री जीव टाकला. अंत्यसंस्कारांच्यावेळीस त्या मुलाने नवी महागडी शाल आईस पांघरली. बोध हाच घ्या की वेळ निघून गेल्यानंतर हाती काहीच उरत नाही, आणि उशिरा सुचलेले शहाणपण माणूस परत मिळवून देत नाही. राबायचं ते आईवडिलांसाठी, त्यांच्या ऋणात कायमस्वरूपी राहण्यासाठी.


बस बाकी हुल्लडबाजी, चैनबाजी, इश्क़बाजी यांकरिता राबायचं नसतं मुळीच. आपल्या माणसांच्या सुखासाठी, त्यांचे दुःख मिटविण्यासाठी, हास्य, आनंद, समाधान देण्यासाठी. क्रौर्य नाही तर प्रेम, स्नेह वाढविण्यासाठी. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग