विशेष वाचनीय

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

इमेज
म्युच्युअल फंडातून Wealth Management शक्य आहे का? हो—आणि कसं? “तुम्ही पैसे साठवताय… की खरोखर वाढवताय? आज घेतलेला छोटा गुंतवणुकीचा निर्णय उद्या तुमचं संपूर्ण आर्थिक भविष्य बदलू शकतो.” “मी, विशाल लोणारी (NISM CERTIFIED) – VHN FINSERV च्या माध्यमातून गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन करत आहे.” मानवी जीवन शतकानुशतके बदलत गेले आहे. उत्क्रांत आणि आधुनिक होत चालले आहे. जगण्यात बदल होत गेले तशा मानवाच्या गरजाही बदलत चालल्या आहेत. गरजा बदलल्यामुळे खर्च आणि संपत्ती दोन्हींमध्येही वाढ करणे हीच मोठी मानवी गरज बनली आहे. त्यामुळे आता संपत्ती निर्माण करावयाची झाल्यास नव्या जमान्याच्या नव्या जोमाने ती निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी एक ताकदवान माध्यम म्हणून Mutual Fund आपल्या समोर येत आहे. आजच्या काळात म्युच्युअल फंडामध्ये एवढी ताकद आहे की, तुमचे बदलतं जीवनमान सुरू राहताना महागाईसोबत लढाई करताना Wealth Management करण्यात प्रभावी पर्याय म्हणजे Mutual Fund. VHN FINSERV च्या माध्यमातून आणि विशाल लोणारी ( NISM CERTIFIED) यांच्या मार्गदर्शनात म्युच्युअल फंडात योग्य पोर्टफोलिओ तयार करून श्रीमंतीसह ...

आमची स्वप्ने

पालकांना सांभाळावे की नाही

अनेकदा असे होते की आपले पालक हे ग्रामीण भागातले, मागसलेल्या विचारांचे, शिक्षणापासून अनभिज्ञ असे असतात. हजारो गोष्टी स्वभावात अशा बसलेल्या असतात की ज्यांचा खूप त्रास होतो, आणि तो ही शुद्ध अडाणीपणामुळे. मग त्या वेळेला स्वाभाविकपणे आपल्याला असा विचार येऊ शकतो की सांभाळतोय आपण आपल्या पालकांना.

सुशिक्षित घरात रोज, आठवड्यातून एकदा, महिन्यातून दोन-तीनदा कडकड भांड्यांचे आवाज येतातच. इथे तर सगळं असते म्हणजे पुढारलेपण विचारात, शैक्षणिक प्रगती असते मग तरीही मतभेद होतात. इथे एकही बाजू दुबळी नसते कोणत्याच बाजूने त्यामुळे कधीकधी जो फटाक्यांचा जॅकपॉट बार काढला जातो ना, त्याचे वर्णन इथे नाही देत बसत. मुद्दा हा  की याहीप्रकारे पालकांचा कंटाळा हा केला जाऊ शकतो.

नाही म्हणाल तरी नियती असतेच, प्रारब्ध कधी कुणाला चुकत नसते. मग ज्यांनी आपल्या आयुष्याच्या प्राक्तनाला गुलाबाचा आयाम दिला, प्राजक्ताच्या सुगंधाप्रमाणे ज्यांनी जीवनाला गंध ल्यायला त्या जन्मत्रात्यांना त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात निराधार करून टाकायचे का ? ज्यांनी आपला एकटेपणा घालवला, समाजात आपल्या अस्तित्वाला एक ओळख दिली, रूप-सौंदर्य, ज्ञान, पैसा, प्रतिष्ठा यादी न संपणारी आहे. ज्यांचे ऋण सातजन्मातही फिटणारे नाही त्यांना आपण वार्यावर सोडून द्यायचे का ?
एवढं पाषाणहृदयी माणसाने आपलं जगण्याचा अधिकारच नाकारायला पाहिजे. आपण आपल्या पालकांना सांभाळायचंच. कुठलाही क्लेशदायक पर्याय आपण स्वीकारणार नाही आहोत, कारण पालक तर आपल्यापैकीही आहेत, मग आपल्यावर अशी निराधार व्हायची वेळ आली तर. एकदा अनाथ आश्रमात जाऊन विचार त्यांना जर आई-वडील मिळाले तर ते त्यांना कधी सोडून जातील ? भळाभळा डोळे वाहू लागतील असे काहीसे ऐकायला मिळेल. आपल्या पालकांना आलवेज सांभाळा.      

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग