विशेष वाचनीय

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

इमेज
म्युच्युअल फंडातून Wealth Management शक्य आहे का? हो—आणि कसं? “तुम्ही पैसे साठवताय… की खरोखर वाढवताय? आज घेतलेला छोटा गुंतवणुकीचा निर्णय उद्या तुमचं संपूर्ण आर्थिक भविष्य बदलू शकतो.” “मी, विशाल लोणारी (NISM CERTIFIED) – VHN FINSERV च्या माध्यमातून गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन करत आहे.” मानवी जीवन शतकानुशतके बदलत गेले आहे. उत्क्रांत आणि आधुनिक होत चालले आहे. जगण्यात बदल होत गेले तशा मानवाच्या गरजाही बदलत चालल्या आहेत. गरजा बदलल्यामुळे खर्च आणि संपत्ती दोन्हींमध्येही वाढ करणे हीच मोठी मानवी गरज बनली आहे. त्यामुळे आता संपत्ती निर्माण करावयाची झाल्यास नव्या जमान्याच्या नव्या जोमाने ती निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी एक ताकदवान माध्यम म्हणून Mutual Fund आपल्या समोर येत आहे. आजच्या काळात म्युच्युअल फंडामध्ये एवढी ताकद आहे की, तुमचे बदलतं जीवनमान सुरू राहताना महागाईसोबत लढाई करताना Wealth Management करण्यात प्रभावी पर्याय म्हणजे Mutual Fund. VHN FINSERV च्या माध्यमातून आणि विशाल लोणारी ( NISM CERTIFIED) यांच्या मार्गदर्शनात म्युच्युअल फंडात योग्य पोर्टफोलिओ तयार करून श्रीमंतीसह ...

सुख म्हणजे नक्की , हे असते

सुख सारखे फसवे काहीच नाही . सुखाची साथ ही फार अल्प काळ सगळ्यांना लाभत आली आहे ,आणि ती प्रत्येकाच्याच वाट्याला येते असे पण नाही . सुख म्हणजे ना फुलासारखे असते सकाळी फुलणारे आणि लगेच सांजवेळी सुकणारे . आपण मात्र त्या फुलाच्या त्या सौदर्याने मोहीत होतो , त्याच्यागंधात मंत्रमुग्ध होत आपल्या शर्टाच्या खिशाला लावून फिरतो , मिरवतो पण आपल्या सुखाची ही अशी उधळवणूकच आपल्या नाशाचे कारण बनत आहे . माणूस जेव्हा अत्यंत सुखात असतो तेव्हा त्याला इतरांचा मत्सर वाटू लागतो,द्वेशभावना पेटते , मनात त्याचा अहंकाराच नामक अभियंता गर्वाचे घर बाधायला लागतो . याऊलट सर्वामध्ये माणसाने मिसळुन राहून माणूसकी दाखवित जगले तर त्याचे सुख शंभरपटीने वाढते .बरंया क्षणभंगूर सुखाच्या मदिरेचे पेग रिचवितांना प्रत्येक गोष्टीचा शेवट हा ठरलेला असतो , हे लोक कसे काय विसरतात,सुखाच्या नशेच्या धुंदीत ते कधीकधी इतके बेभाम वाहवत जातात की कधीतरी आपल्या जवळच्या व्यक्तीँची किँमंत आपल्या लेखी कमी करुन ,त्यांना तुच्छतेची हीनअशी वाईट दर्जाची वागणूक मिळते.पण हे सगळे मृगजळ असते सुख ओसरणाच एकट तुम्हाला किती काळं भिजतं घालणार . खरं की नाही 
या उलट परिस्थिती दुखाची आहे . 


माणूस जेव्हा दुखात असतो ना,संघर्ष करत तेव्हा तो खरं जीवन जगत असतो .कारण याच कष्टाचे चीज होवून त्याला सुखाचा पिज्जा खायला मिळणार आहे हे त्याला पक्कं ठावूक असते .या दुखाच्या कङक उन्हातून तळतळत जाताना , तहानेने व्याकूळ आणि भूकेने पोट जळत असतांना होणारा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा फायदा हा की यावेळेस आपल्या आयुष्यात अनेक साक्षात्कार होत असतात या वेळी ङोक्यावर छप्पर धरणारा,पाण्याच्या झर्यापर्यत पोहोचवणारा आणि स्वत: ताटावर बसलेला असताना आग्रहाने आपल्याला जेवू घालणारी व्यक्तीच तुमची हक्काची असते 


बाकी फक्त लालसेपोटी सुखात तुमच्या आनंदाच्या पावसात न्हावून घेणारी लोक दुखाच्या बोचर्या थंङीत येवून चल दोघंबी कुङकुङू असे म्हणणार नाही . तेव्हा माणसाची खरी जाणती आपल्याला आसवे गळतांनाच होत असते . आपल्या हस्याचे कोणीपण कौतुकच करणार ना अस्संल हिरा तोचजो आपली आसवे टिपून त्याची फुलं करणार तेव्हा जे सुख मिळते तेच खरे सुख त्यातच खरा हर्ष मानावा बाकी वरवरच्या आनंदाला अर्थच नाही 


तात्पर्य हेच की सुख तुमचे असले तरी त्यातच गुरफटू नका दुखाची जाण राखून आस्ते आस्ते उपभोगा सगळ्यांना एकत्रित करुन रहा आणि मूळात हे मृगजळ आहे वाहून पुन्हादुखाचे ऊनच राहणार लक्षात ठेवा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग